Monday, 7 July 2014

असे जीवनाचे ऋतू फार आले
पुन्हा आसवांचे  हसे फार झाले
तसा सावराया मला  मीच होतो
जरी जीवघेणे असे वार झाले

तुझ्या वेदनांचे ठसे व्यर्थ काही
तुझ्या यातनांचे मुके अर्थ काही
जगी वावराया , पुरे एवढेसे
तुझ्या सोबतीची मला आस नाही

कसे काय सांगू ,जपतो उराशी
कसे दु:ख माझ्या भिजते उशाशी
तरी बोललेलो , कितीदा तुला मी
नको खेळ खेळू असे काळजाशी

जरी वादळे ही  सदोदीत देवा
कधी थांबलो ना तुझ्या पायरीला
नसे वाकण्याचे स्वभावात माझ्या
असे मोडलेला कणा सोबतीला

--भालचंद्र

1 comment: